Motivational Quotes in Marathi | 1100+ प्रेरणादायी विचार मराठी मध्ये
निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते. बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात. परंतु, जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरवात होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशन ची कमतरता. आपल्याला आपल्या जीवनात मोटिवेशन ची खूप गरज असते म्हणूनच आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स Motivational Quotes in Marathi जे आपले जीवन बदलतील.
Powerful Motivational Quotes in Marathi
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका,
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.

लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.
रस्ता सापडत नसेल तर.
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.
नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.

विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

प्रेरणादायक मराठी कोट्स जे तुम्हाला प्रगतीसाठी प्रेरित करतील
ज्याच्याजवळ उमेद आहे,
तो कधीही हरू शकत नाही.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.

वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल..

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.
स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.

तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर ,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.
शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.
स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रेरणादायक कोट्स
रुद्राक्ष असो किंवा माणूस
खुप अवघड असत एकमुखी भेटणं.
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!
यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा
अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.
काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो अनुभव.
बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार केलेला बरा.
स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.
भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.
जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.
कठीण प्रसंगात पुढे जाण्यासाठी प्रेरणादायक मराठी विचार
यशाचा उत्तम मार्ग म्हणजे
अजुन एकदा प्रयत्न करने होय.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.
गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.
चांगल्यातुन चांगले निर्माण होते
वाईटातून वाईट.
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.
वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.
एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.
कधी कधी काही चुकीची माणसं
आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.
आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.
आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.
कठीण प्रसंगांचा सामना करण्यासाठी प्रभावी कोट्स
रस्ता भरकटला असाल तर
योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.
एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.
क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.
आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.
एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.
माणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
विकारावर विजय मिळवण्यासाठी प्रेरणादायक विचार
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.
सगळी परिस्थती नीट समजून घेतल्याशिवाय
कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका
दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही
याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही.
न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.
हरला म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
ध्येय उंच असले की ,
झेप देखील उंचच घ्यावी लागते.
आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.
पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.
सर्वात मोठा रोग
काय म्हणतील लोक.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे,
जर टिकून राहायचे असेल तर,
चाली रचत राहाव्या लागतील.
जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही,
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
हल्ली चांगल्या कामाला
मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.
माझ्यामागे कोण काय बोलतं,
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.
तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य
तलवार असेतोवरच टिकते.
आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
स्वत:ला ओळखण्यासाठी आणि उंची गाठण्यासाठी प्रेरणादायक विचार
काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात
करून दाखवायच्या असतात.
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.
चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय
डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे.
आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते.
खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल
तर एकट्याने लढायला शिका.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.
ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.
फक्त मदत मागा
सगळे लायकी दाखवतील.
तुम्ही माझा व्देष करा
किंवा माझ्यावर प्रेम करा
दोन्हींचा फायदाच आहे
प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन
व्देष कराल तर मी तुमच्या मनात असेन.
स्वाभिमान विकूण मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.
स्वतःला ओळखून जीवन बदलण्याचे प्रेरणादायक विचार
क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.
सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडूनच उसने मिळत नाही.
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते.
यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत
याचा विचार करत बसत नाहीत.
आयुष्यात आजवर जगलो,
प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो,
विश्वास टाकला, चुका केल्या,
पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो.
कितीही विपरीत परिस्थिती असू द्या,
मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही
तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच,
आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही
त्याच प्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य
कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच.
तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल
ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल,
हा निसर्गाचा अटल नियम आहे.
फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय,
तोच नेहमी इतरांना हसवू शकतो,
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.
दगडाने डोकेही फुटतात
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
तर लोक त्यावर डोकं टेकतात.
जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर
माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली
तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.
आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
वैयक्तिक वाढीसाठी प्रेरणादायक विचार
कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
गणितात कच्चे असाल तरी चालेल,
पण हिशोबात मात्र पक्के राहा.
कोणतीही चूक वाया घालवू नका
त्यातून काहीतरी शिका.
यश साजरं करणं ठीक आहे
पण त्यापेक्षा महत्वाचं आहे
अपयशातून धडा शिकणं.
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका
तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील.
नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?
टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.
मोठी स्वप्ने पाहणारेच
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.
स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.
लक्ष्य साधण्यासाठी प्रेरणा देणारे मराठी कोट्स
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन
कधी येईल सांगता येत नाही.
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
पण समाधान हे महाकाठीन,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,
पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
प्रत्येक पाऊल योग्य नसते,
पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
ते धेय्य नक्की गाठतात.
कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.
अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.
दु:ख कवटाळत बसू नका;
ते विसरा आणि सदैव हसत रहा.
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.
मनात आणलं तर या जगात
अश्यक्य असं काहीच नाही.
आवडतं तेच करू नका;
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
तुम्ही जिथे जाल तिथे
तुमची गरज निर्माण करा.
आपले ध्येय गाठण्यासाठी प्रेरणादायक कोट्स
सगळेच निर्णय मनाने घेऊ नका;
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे
त्याविषयी कमी बोला,
आणि ज्या विषयाची माहिती नाही
त्या विषयी मौन पाळा.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत;
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
जे झालं त्याचा विचार करू नका;
जे होणार आहे त्याचा विचार करा.
लक्षात ठेवा-आयुष्यात
कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला देवपण येत नाही.
यश न मिळणे याचा
अर्थ अपयशी होणे असा नाही.
आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा
काय कमावलंत ह्याचा विचार करा.
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय
ते आजच ठरवा….आत्ताच !
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
परिस्थितिला शरण न जाता
परिस्थितीवर मात करा.
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या
त्यागातून निर्माण होत असतो.
बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून शिकावं.
जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल,
तर खाचखळगे पार करावेच लागतील.
जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये;
परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !
मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून
आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते.
निश्चयी भिकारी हा अनिश्चयी
सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.
बुध्दीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकारू नका.
कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.
ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते;
तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.
डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
जीवनात पुढे जायचे असेल तर
आपल्या अनावश्यक गरजा
वाढणार नाहीत याची काळजी घ्या.
यशस्वी जीवनासाठी प्रेरणादायक विचार
एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं.
अशक्य हा शब्दच आपल्या
शब्दकोशातून काढून टाका.
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी मनावर संयम ठेवणे,
शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.
इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.
अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.
विचार कराण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थाबंवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.
पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.
लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल
काय मत आहे हे महत्त्वाचे.
मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.
जीवनातील काही पराभव हे
विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.
अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.
आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.
असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय
ते कधीच उभे राहू शकत नाही.
कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.
कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज
तिची खरी किंमत कळत नाही.
ढीगभर आश्वासनांपेक्षा
टीचभर मदत केव्हाही चांगली.
ध्येयाचा ध्यास लागला;
म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
Inspirational Quotes in Marathi
काही बदलायचं असेल तर
सर्वात आधी स्वत:ला बदला.
शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याच्या अंगी असते,
तोच खरा कर्तृत्ववान होय.
आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा.
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
परिस्थितीच्या अधीन होऊ नका,
परिस्थितीवर मात करा.
ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील
उतावळेपणाचे भय असते.
म्हणूनच, कोणत्याही कामात
उतावळेपणा करु नका; संयम पाळा.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
नाती कितीही वाईट असू दे
ती कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असलं
तरी ते तहान नाही तर
आग तरी विझवु शकते.
अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.
जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.
माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.
मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य
अधिक शोभून दिसतो.
Motivational Thoughts in Marathi
आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलो
पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?
मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.
आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
परीक्षा म्हणजे स्वत:च्या
आत डोकावून पाहण्याची संधी !
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते
ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात
एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !
चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम.
आधी विचार करा; मग कृती करा.
निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.
चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत;
ते मिळवावे लागतात.
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो
आणि लोक हसत असतात.
मरताना आपण असं मरावं की
आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
आयुष्यात असं काहीतरी मिळवा
जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऐकतो ते खोटं
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका;
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
Inspirational Thoughts in Marathi
काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण
काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!
शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा.
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही.
तलवारीच्या जोरावर मिळवलेलं
राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून,
वाचून, बघून समजत नाही.
मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली पायरी असते.
जगात सारी सोंगे करता येतात,
पण पैशाच सोंग करता येत नाही.
प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका.
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
Motivational Status in Marathi
चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.
तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.
झाडासारखे जगा, खूप उंच व्हा.
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका,
आणि जर का घेतले तर,
त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.
अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं,
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.
ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो.
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात,
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !
आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,
पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे,
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे,
तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.
समर्थक कमी झाले तरी चालतील,
पण विरोधकांची गर्दी
कमी होता कामा नये,
कारण आपल्या प्रगतीत
विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो.
सांभाळून चला,
कारण कौतुकाच्या पुलाखाली
मतलबाची नदी वाहत असते.
कर्म जेव्हा वसुलीवर येते,
त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही,
त्यामुळे आपल्या कर्माशी आणि
कार्याशी प्रामाणिक राहून
आयुष्याची वाटचाल करा.
आपला वेळ मर्यादित आहे,
तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात
वाया घालवू नका.
अवघड आहे कठीण आहे
म्हणून सोडून दिल असत तर
स्वराज्य उभच राहील नसतं.
मोक्यावर साथ सोडणारी माणसं
बऱ्याचदा तीच असतात
ज्यांना कधीकाळी आपण
डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो.
बाकी कोणतीही कला
आली नाही तरी चालेलं,
पण समजून घेण्याची कला
आली की जीवनात
सगळ सोप्प होतं.
हे हि वाचा : लाईफ स्टेट्स मराठी
आपल्याला जर हे मोटिवेशनल कोट्स Motivational Quotes in Marathi आवडले असतील तर जरूर आपल्या मित्रांसोबत व आपल्या परिवारासोबत शेअर करा. मला Twitter, फेसबुक, Pinterest व इंस्टाग्राम वर जरूर फॉलो करा.